शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

चिकोत्रा नदीवरील उपसाबंदी नावापुरतीच, विद्युत पुरवठा खंडित : विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा;ग्रामपंचायतीची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:38 IST

सेनापती कापशी : गेली तीन-चार वर्षे सातत्याने पाणीटंचाईलासामोरे जाणाºया चिकोत्रा खोऱ्याला यंदाही मोठ्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.

शशिकांत भोसले।सेनापती कापशी : गेली तीन-चार वर्षे सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या चिकोत्रा खोऱ्याला यंदाही मोठ्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. चिकोत्रा धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर महावितरणपाटबंधारे विभागाकडून उपसाबंदी लागू केली जाते; पण हा उपसाबंदीचा आदेश झुगारून स्वत:ला बागायत शेतकरी समजणारे काहीजण राजरोसपणे विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा करत आहेत. परिणामी सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होऊन ग्रामस्थांना पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे.चिकोत्रा खोऱ्यातील ५२ गावांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर बनत चालला असून, चिकोत्रा प्रकल्पात होणाराकमी पाणीसाठा हे त्याचे प्रमुखकारण आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यापासून फक्त दोनचवेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे.चिकोत्रा प्रकल्प परिसरात असणारे पावसाचे अल्प प्रमाण व धरण क्षेत्रात येणाºया पाण्याचे कमी स्रोत यामुळे हा प्रकल्प जास्तीत जास्त ६५ ते ७० टक्केच भरतो. पावसाळ्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याकरिता योग्य ते नियोजन करण्याचीगरज आहे; पण राजकीय पातळीवरून अथवा प्रशासनाकडून तशीभरीव हालचाल होत नसल्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील जनतेला सातत्याने मोठ्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.1 प्रकल्पात असणारा अत्यल्प पाणीसाठा व पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेले भरमसाट पाणी परवाने यामुळे या खोºयाचा पाणीप्रश्न येथूनपुढे भीषण होणार आहे.2 काही शेतकरी तर अनधिकृतपणे थेट पाणी उपसा करत आहेत. ज्यावेळी कारवाई करायची वेळ येते, त्यावेळी पाटबंधारे व महावितरणचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवितात. यामुळेच अशा शेतकºयांचे फावत आहे.3 पाटबंधारे व महावितरणच्या अधिकाºयांनी समन्वयाने योग्य नियोजन केले तर सुरळीत पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतींना शक्य आहे, अन्यथा चिकोत्रा नदीकाठावरील ५२ गावांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर होणार आहे.महावितरणकडून दुर्लक्ष : बेसुमार पाणी उपसाचिकोत्रा प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर जास्तीत जास्त सात ते आठ दिवसांत नदीपात्र कोरडे पडते. यावरून पाणी किती मोठ्या प्रमाणात उपसा होते याची कल्पना येते. काही हुशार बागायत शेतकरी तर पाणी नदीपात्रात आलेले पाहताच उपसाबंदी झुगारून राजरोसपणे दिवसाढवळ्या आकडे टाकून बेसुमार पाणी उपसा करत आहेत. अशा काही शेतकºयांना पाटबंधारे व महावितरणच्या संबंधितांकडून कायम अभय मिळत असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.आता थेट अशा अधिकाºयांवर मोर्चा काढून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करणार आहेत. आजपर्यंत बेकायदा पाणी उपसा करणारे अनेक मोटारपंप ग्रामस्थांनी दाखवून दिले; पण कोणतीही कारवाई न करता सोडल्यामुळे असे शेतकरी राजरोसपणे आकडे टाकून पाणी उपसा करत आहेत.